केळी पीक - उन्हाळ्यात होणारा परिणाम

12-03-2024

केळी पीक - उन्हाळ्यात होणारा परिणाम

केळी पीक

उन्हाळ्यात होणारा परिणाम

अधिक तापमान व तीव्र सूर्यप्रकाश

  • तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्‍चिमेकडील कडा करपते.
  • नवीन लागवड केलेल्या रोपांच्या पानांची सुरळी होऊन पाने उमलत नाहीत. पाने पांढरी राहून करपतात. करपलेल्या ठिकाणी काळे डाग उमटतात.
  • तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांमधील पाण्याचे होणारे उत्सर्जन बाष्पीभवनाद्वारे वेगाने होते. 
  • झाडांमधील विकर आणि संप्रेरकांची कार्यक्षमता कमी होते. बऱ्याचदा ते नष्ट होतात.
  • उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअसने अधिक असते. 
  • यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत जातो. याचा झाडाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरित परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते.
  • वातावणातील आर्द्रता १०-२० टक्क्यांपर्यंत खालावते. या सर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर होतो. वाढ खुंटते.
  • घड निसवणीच्या अवस्थेत असताना निसवण पूर्णपणे न होऊन घड अडकतात, बाहेर पडत नाही. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपतात आणि वाळून जातात. 
  • घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे व फण्या गळण्याचे प्रमाण वाढते. झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते.

उष्णलाटा, वेगवान वारे

  • उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो.
  • वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते.
  • वादळी वारा व गारपिटीमुळे झाडांची पान फाटून पूर्णंत नष्ट होतात, घड पडतात, घड व खोडावर जखमा होतात, झाडे उन्मळून पडतात.

banana plant, keli rope, banana

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading