सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज निर्मित भू – समृद्धी सेंद्रिय खत
भू – समृद्धी सेंद्रिय खत
भु समृद्धी® सेंद्रिय खत शेणखताला एक उत्तम पर्याय असून शेणखताच्या तुलनेत भु समृद्धी® सेंद्रिय खत अन्नद्रव्ये, सुक्ष्म जिवाणू व पिक वाढीसाठी लागणार्या घटकांनी समृद्ध आहे. हे गव्हाचा भुसा, पोल्ट्री वेस्ट (कोंबड खत), जिप्सम, शेणखत, सोयाबीनचा भुसा, एरंडी पेंड, कोकोपीट इत्यादी पासून बनले आहे.
पिके:
पिक
भु समृद्धी® सेंद्रिय खत देण्याची वेळ
वापरण्याचे प्रमाण
द्राक्षे
एप्रिल छाटणीचे वेळी
३ ते ५ टन प्रती एकर
ऑक्टोबर छाटणीचे वेळी
२ ते ३ टन प्रती एकर
केळी
लागवडीचे वेळी
२ ते ३ टन प्रती एकर
लागवडीनंतर २ ते ३ महिन्यांनी २ वेळा
१ टन प्रती एकर
डाळींब
ताण सोडल्यानंतर
५ ते २० किलो प्रती झाड
टोमॅटो
लागवडीचे वेळी
१ टन प्रती एकर
लागवडीनंतर १ महिन्याने
५०० किलो प्रती एकर
ऊस
लागवडीचे वेळी
२ ते ३ टन प्रती एकर
बांधणी करताना
२ ते ३ टन प्रती एकर
पपई
लागवड करताना
१ टन प्रती एकर
दर २ ते ३ महिन्यांनी
१ टन प्रती एकर
कापूस
लागवडीचे वेळी
२ टन प्रती एकर
कांदा, लसून
लागवडीचे वेळी
१ टन प्रती एकर
आंबा, काजू, नारळ
लागवडीचे वेळी
२५ किलो प्रती झाड
दरवर्षी जूनमध्ये
२५ किलो प्रती झाड
इतर भाजीपाला
लागवडीचे वेळी
२ टन प्रती एकर
इतर फळपिके
लागवडीचे वेळी
२० किलो प्रती झाड
दरवर्षी जूनमध्ये
२५ किलो प्रती झाड
अन्नधान्य, कडधान्य व तेलबीया
लागवडीचे वेळी
१ ते २ टन प्रती एकर
भु समृद्धी® सेंद्रिय खताचे फायदे
भु समृद्धी® सेंद्रिय खत संपूर्णतः कुजलेले भरखत असून हे सेंद्रिय कर्बाने समृद्ध आहे. याच्या वापराने जमिनीच्या सेंद्रिय कर्बात भर पडून उपयुक्त जिवाणूंना अन्नपुरवठा होत असल्याने जमिनीचे जैविक तसेच भौतिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
भु समृद्धी® सेंद्रिय खतामधून पिकांना आवश्यक असणारे सर्व अन्नघटक नैसर्गीकरित्या उपलब्ध होत असल्याने पिकांची व मुळांची जोमाने वाढ होते.
अन्नद्रव्यांसोबतच इतर पोषक घटक भु समृद्धी® सेंद्रिय खतामधून मिळाल्याने पिकांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची कीड व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने पाने, फुले व फळांची गळ थांबून फळांना आकर्षक रंग व चमक येते.
पिकांच्या आरोग्यात भु समृद्धी® सेंद्रिय खतामुळे सुधारणा होत असल्याने मुळकूज, मर, रोपे सुकणे व पिवळी पडणे यांसारख्या विकारांचे प्रमाण कमी होते.
भु समृद्धी® सेंद्रिय खत कुठल्याही प्रकारच्या सेंद्रिय अथवा रासायनिक खतांमध्ये सहजपणे मिसळता येते.
भु समृद्धी® सेंद्रिय खत रासायनिक खतांसोबत मिसळून वापरल्याने त्यामधील अन्नद्रव्यांचा विविध कारणांनी होणारा र्हास कमी होऊन त्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. परिणामी रासायनिक खतांचा वापर कमी करता येऊ शकतो.
जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने वाढून अधिक काळापर्यंत जमिनीत ओलावा टिकून रहातो.