कांदा बियाणे विकणे आहे.
खात्री शुध्दतेची व सेवेची
रब्बी हंगाम (कालावधी 120 दिवस)
उत्तम टिकवण क्षमता
अर्धा व एक किलोच्या पॅकिंगमध्ये आहेत
भीमा शक्ती
- पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत रब्बी हंगामासाठी प्रसारित,
- महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत रांगडा हंगामासाठी प्रसारित.
- लागवडीनंतर रांगडा व रब्बी हंगामामध्ये 125 ते 135 दिवसांत काढणीस.
- सरासरी उत्पादन रांगडा हंगामामध्ये हेक्टरी 35 ते 40 टन.
- रब्बी हंगामामध्ये हेक्टरी 28 ते 30 टन.
- साठवण क्षमता 5 ते 6 महिने.
- फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.
फुले समर्थ
- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात खरीप आणि रांगडा हंगामासाठी स्थानिक वाणातून विकसित.
- कांदे उभट गोल असून, चमकदार गर्द लाल रंगाचे.
- कांद्यांची माण बारीक, पातीची वाढ मर्यादित राहून कांदा पोसण्याचा वेग जादा राहतो.
- हा वाण तीन ते चार आठवडे आधी तयार होतो.
- खरीप हंगामात लागवडीनंतर 75 ते 85 दिवसांत, रांगडा हंगामात 85 ते 100 दिवसांत तयार.
- कांदा लवकर तयार होतो तसेच कांद्याला पक्वता येताच नैसर्गिकपणे संपूर्ण पात पडते.
- त्यामुळे 2 ते 3 पाण्याच्या पाळ्यांची बचत होते.
- कांदे लागवडीपासून साधारणतः 80 ते 90 दिवसांत तयार होतात.
- खरीपात उत्पादन सरासरी हेक्टरी 25 टन आणि रांगडा हंगामात हेक्टरी 30 ते 35 टन.
- साठवण क्षमता साधारणपणे 2 ते 3 महिने.